संस्थान

सदुपासना सत्कर्म । सत्क्रिया आणि स्वधर्म ।
सत्संग आणि नित्यनेम । निरंतर ।।

rss-hero-content-bottom-img
vyav-home-img

व्यवस्थापन

sansthan-vyav-img
श्रीसमर्थांच्या हयातीतच त्यांच्या प्रमुख शिष्यांनी श्रीसमर्थांच्या नंतर संस्थानची व्यवस्था पाहण्याची असमर्थता व्यक्त केल्याने श्रीसमर्थांनी अशी आज्ञा केली की, त्यांचे पूजनीय ज्येष्ठ बंधू श्रीगंगाधर सूर्याजी ठोसर यांचे चिंरजीवास संस्थानचे अधिपती करावे. परंतू श्रीसमर्थांचे निर्वाणानंतरच्या अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे शिष्यांना श्रीसमर्थांच्या पुतण्यांना श्रीसमर्थांचे जन्मस्थान जांब येथून आणणे जमले नाही. यामुळे समर्थशिष्य आक्काबाई व उद्धवस्वामी यांनी संस्थानची व्यवस्था २८ वर्षे सांभाळली. श्रीसमर्थांच्या इच्छेनुसार छत्रपती शाहू महाराजांनी श्रीश्रेष्ठ गंगाधर (ठोसर) स्वामी यांचे नातू श्रीगंगाधर रामजी ठोसर यांना इ.स. १७१० मध्ये जांबहून सज्जनगडावर आणले आणि त्यांना समारंभपूर्वक संप्रदायाचे व संस्थानचे अधिपती केले. तेव्हापासून संस्थानच्या अधिपतीपदी श्रीसमर्थ वंशातील व्यक्ती
असते. मा.जिल्हा न्यायाधीश सातारा यांनी संस्थानच्या व्यवस्थापनेसाठी घटना तयार केली आहे. सदर घटनेप्रमाणे मा.जिल्हा न्यायाधीश विश्वस्तांची नेमणूक ६ वर्षासाठी करतात. संस्थानचा कारभार योग्य प्रकारे चालावा म्हणून वार्षिक अंदाजपत्रक, ऑडिट झालेली जमाखर्चाची पत्रके व वार्षिक अहवाल मा. जिल्हा न्यायाधीशांना सादर करणे इ. तरतुदी संस्थानच्या घटनेत असून घटनेतील तरतुदींची पूर्तता केली जाते.

श्रीरामदास स्वामी संस्थान, सज्जनगड - विश्वस्त मंडळ

श्री. दुर्गाप्रसाद अ. स्वामी
अध्यक्ष व अधिकारी स्वामी

श्री. सू. ग. तथा बाळासाहेब स्वामी (सी.ए.)

डॉ. ज्योत्स्ना कोल्हटकर (एम.ए. पीएचडी)

अ‍ॅड. श्री. महेश कुलकर्णी (बी.ए. एलएलबी)

डॉ. श्री. अनंत निमकर (आयुर्वेदाचार्य)

श्री. दिपक व. पाटील (बी. ई. सिव्हील)

मे. उपविभागीय अधिकारी, सातारा (मे. कलेक्टर व कोर्ट ऑफ वॉर्डस्, सातारा यांचे प्रतिनिधी)

rss-contact-bottom-img
Language